Type Here to Get Search Results !

Banner

नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्टीव मोडवर !



  • मुख्यमंत्र्यांची (chief minister) प्रशासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे. यावेळी मराठवाड्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूरातील पूराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

  • राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस कोकण (kokan) मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता असून मुंबई (mumbai), ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अदाज आहे. धुळे, परभणी, नागपूर, जळगाव, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नांदेड, बुलडाणा, वाशीम, अकोला, गोंदिया, अमरावती, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे मंत्रिमंडळ खातेवाटपापूर्वी उद्यापासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या मंत्रिमंडळ वाटपात देवेंद्र फडणवीसांना धक्के बसतील असेही सांगण्यात येते आहे. यापूर्वीच पक्षश्रेष्ठींच्या इच्छेने फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले आहे. त्यांच्या कारकिर्दीत ते आता सर्वोच्च ठिकाणी असताना, पक्षश्रेष्ठींचा हस्तक्षेप वाढल्याचे दिसते आहे. काही जुन्या निष्ठावंतांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालय भाजपाकडे राहिल आणि ते फडणवीसांऐवजी सुधीर मुनगंटीवारांना (sudhir mungativar) देण्यात येईल, अशीही चर्चा आहे.

  • भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somayya) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakare) यांचा माफिया म्हणून उल्लेख केला आहे. यावरूनच आता शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर सोमय्या यांनी एक ट्वीट केले. ज्यात त्यांनी शिंदे यांचं अभिनंदन करत म्हटलं आहे की, ''मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन केले.'' याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये.''

  • जिल्ह्यातील विकास हा त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्याकडे असतो. शिंदे सरकारने अजून पालकमंत्र्याची निवड केली नाही. अजित पवार (ajit pawar) यांच्या अंतर्गत येणाऱ्या या विभागाने 36 जिल्ह्यांसाठी 13 हजार 340 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र आता त्याला नव्याने जारी केलेल्या शासन आदेशानुसार तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय. सरकार परवानगी देत नाही तोपर्यत 13 हजार 340 कोटींचा निधी मंजूर केला जाणार नाही, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील विकास कामे खोळंबण्याची शक्यता आहे.

  • राजकीय धक्क्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या बदल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून रोखण्यात आल्या आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेत आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. तर सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुंडे यांची बदली करण्यात आली होती. याबरोबरच औरंगाबादचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची सिडकोमध्ये दीपा मुंडे यांच्या जागी बदली करण्यात आली होती. या सर्व बदल्या शिंदे- फडणवीस सरकारने रोखल्या आहेत.

  • औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर (Aurangabad-sambhajinagar) करण्यावरून आक्रमक झालेल्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. औरंगाबादचे नाव संभाजी नगर केल्यास कायदेशीर लढाई लढण्याबरोबरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील जलील यांनी दिला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार असो किंवा खासदार कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही, कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही यासाठी सरकार सक्षम असल्याचा इशाराच शिंदे यांनी एमआयएमला दिला आहे.

WhatsApp group links- https://bit.ly/3yNUIiS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या